Sunday, July 19, 2009

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात...

सध्या सगळीकडे एक गोष्ट कायम ऐकायला येते की, मी फारच बिझी आहे. बिझी असणे हा जणू परवलीचाच शब्द बनलाय...पण नक्की बिझी असण्याची अवस्था म्हणजे काय असते ?
मानवाला मिळालेली दैवी देण म्हणजे मन. बिझी असण्यात मन किती बिझी असते, याचा सखोल विचार केला तर लक्षात येईल की बिझी म्हणवणा-या देहात असलेले मन खरोखरच बिझी आहे की सगळा नुसताच व्यर्थबोध !
मनाप्रमाणे काम नसले की माणसे केवळ शरीरारने कार्यरत असतात, आणि मनाप्रमाणे काम मिळाले तरी शारिरीक श्रमापासून सुटका नाही. तर अशावेळी मनाचा विचार कितीवेळा होतो...
अनेक दिवसांनी केवळ मनाचा विचार करण्यासाठी काही वेळ राखून केवळ मनाचा विचार केला. त्यावेळी मनामध्ये अनेक दिवसांपासून, अनेस विषयांवरच्या प्रश्नांचा केवळ कल्लोळ झालेला दिसला....या कल्लोळाला असलेली अथांगता पाहून मनात प्रचंड भीती निर्माण झाली...
...वाटलं की, मनात निर्माण झालेले एवढे प्रश्न, म्हटलं तर थेट आपल्याशी आणि आपल्या सभोवताली असणा-यांशी संबंधित...कधी सोडवणार आपण हे प्रश्न आपल्या बिझी असण्यातून....केवळ बिझी नाही तर मानवी जीवनातील असमाधानही कायम आहे, द्वंद्व संपत नाही, द्वेष-हेवा-मत्सर-स्वार्थ यांचा मनावरील पगडा जात नाही.

अशावेळी काय करायचे ?

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात मी खोलवर बुडून गेलोय...

1 comment:

Unknown said...

Tu ya prashna chya kallolat budun gelayes ...
HA HI EK PRASHNCH (?) AAHE.