मन मनास उमगत नाही...
विश्वात असलेल्या लाखो अवकाशगंगा...अवकाशगंगेत असलेली एखादी अवनी...त्या अवनीवर असलेला एक भारत...भारतात असलेली मुंबई आणि त्या मुंबईत असलेला एक मी...
कशाच्या तरी सतत शोधात...
शोध कसला...व्यक्तीत्त्वाचा..व्यक्तीमत्त्वाच्या...अवकाशगंगेत असलेल्या या अवनीवरील माझ्या अस्तित्त्वाच्या प्रयोजनाचा....
सध्या अनेक उत्तरीत प्रश्नही अनुत्तरीत वाटताहेत...
मनाची ही स्थिती अनाकलनीय...पण ही अनाकलनीय अवस्थाही झालीये परिचित...
पाहूया आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय काय अनुभूती येते ती...
तुम्ही आणि मी मिळून चर्चा करूया...शेअर करूया आपले अनुभव या ब्लॉगच्या माध्यमातून...