Friday, June 19, 2009

जिहाल ए मस्ती...

अनेक दिवसांनी आज मनसोक्त संगीत ऐकावसं वाटलं...आणि सगळी कामे सोडून ते ऐकलं.
संगीतात किती ताकद आहे, मूळात भारतीय संगीत, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, अभिजात, सुगम, लोकसंगीत किंवा अन्य किती म्हणून व्हरायटी आहे त्यात.
भारतातल्या भाषा, त्या भाषांचा लहेजा, त्याला मिळालेली स्वरांची अन् सुरांची साथ...विलक्षण सौंदर्याचे आविष्कारचं या सा-यातून जन्माला येतात.
गुलाम अलीची 'ये दिल ये पागल दिल मेरा'...असंख्य वेळा ऐकूनही मनाची तृप्ती अशी होतच नाही.
त्यातील एक अंतरा...
'अब मै समझा तेरे रुक्सार पे तील का मतलब
दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रख्खा है'...
शब्द, स्वर, गायकी, सुर सारं काही अगदी विलक्षण....गुलाम अली, ज्याचे साक्षात स्वर गुलाम आहेत, असे गायक. गझलमधील शब्दांचा सुरांच्या मदतीने प्रत्येक रेशीम पदर उलगडवून दाखवणारा एक समृद्ध गायक...
म्युझिक थेरपी हा प्रकार मला फारसा माहित नाही, पण ही थेरपी जर खरी असेल तर निश्चित संगीतामुळे माणसाच्या अनेक समस्या लीलया सुटू शकतील...
फार लिहायचयं, पण सध्या इतकचं.

2 comments:

Smita said...

Hi,
you said it rightly.. Music, any of its kind does creat a really wonderful effect. We all experience it even in our daily hectic routine..
Music Therapy.. yes, it's a blessing to us. It has surely proved helpful in soothing the disturbed minds, offering calmness from within and curing mental and physical illnesses too.

The one who can not find soothening and tranquilising feel from the music, can be called an unfortunate soul..

- smita

Unknown said...

वा ताराच छेडल्यात. लेख छान झालाय, अजून छान गाण्यांची उजळणी होईल असं वाटत असतानाच संपवल्यानं वाढलेल्या अपेक्षा तशाच राहिल्या.